उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करण्याची पृथ्वीराज पाटील यांची चेतावणी !

सांगली येथे काँग्रेसच्या उमेदवारीचा वाद टोकाला !

सांगली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा वाद टोकाला गेला आहे. ‘काँग्रेस पक्षाने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी न दिल्यास लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून स्वाभिमानी सांगलीकरांच्या साथीने निवडणूक लढवू’, अशी चेतावणी पाटील यांच्या समर्थकांनी दिली आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या घरी २२ ऑक्टोबर या दिवशी कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी ही चेतावणी देण्यात आली. काँग्रेस नेत्यांनी कुणाच्या दबावतंत्रामुळे घातकी निर्णय घेतला, तर हानी होणार आहे. पक्षाने ग्राऊंड अहवाल पहावा. पायावर धोंडा मारून घेऊ नये, असे आवाहन मराठा समाज संस्थेचे ए.डी. पाटील आणि माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी यांनी केले आहे.