Stop Cricket Match : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे १२ ऑक्टोबरला होणारा भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्याला अनुमती नाकारावी !
हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे मागणी
भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रंगारेड्डी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि शमशाबाद येथील साहाय्यक पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले. १२ ऑक्टोबर या दिवशी भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघांमध्ये टी-२० क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे. त्याला अनुमती नाकारण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअसे निवेदन देण्याची वेळी राष्ट्रप्रेमींवर का येते ? वास्तविक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकार यांनी बांगलादेशाशी क्रिकेट सामने खेळण्याविषयी असा करार करणे अपेक्षित नव्हते ! |