भिवंडीमध्ये निजामपुरा येथे १ सहस्र किलो गोमांस पकडले !

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग !

प्रतीकात्मक चित्र

भिवंडी – ऐन नवरात्रीत ६ ऑक्टोबर या दिवशी निजामपुरा येथे गोरक्षकांनी १ सहस्र किलो गोमांस पकडले. बजरंग दल कल्याण विभाग संयोजक श्री. दादा गोसावी, बजरंग दल भिवंडी जिल्हा सहसंयोजक श्री. सूरज केसरवाणी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी ही धाड घातली. या धाडीत ९ गोवंशियांची कापलेली मुंडकी आणि १ टन गोमांस पकडण्यात आले.

संपादकीय भूमिका :

  • गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही तिची एवढी दयनीय स्थिती असेल, तर दर्जा देण्याला काही अर्थ आहे का ? केवळ नावापुरता नको, तर गोवंशियांची हत्या थांबली, तर राज्यात तिचा खरा सन्मान झाला आहे, असे होईल !
  • जे गोरक्षकांना दिसते, ते पोलिसांना दिसत का नाही ?