अमरावती येथे ‘सर तन से जुदा’च्‍या घोषणा देत धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण !

  • गाझियाबादमधील धर्मांधांच्‍या दहशतीचे लोण महाराष्‍ट्रात !

  • ३० हून अधिक पोलीस घायाळ

  • २२ हून अधिक पोलिसांच्‍या वाहनांची तोडफोड

(सर तन से जुदा म्‍हणजे शिर धडापासून वेगळे करणे)

प्रतिकात्मक छायाचित्र

अमरावती – गाझियाबादच्‍या श्री डासनादेवी मंदिराच्‍या ठिकाणी ४ ऑक्‍टोबरला सहस्रो धर्मांध जमले होते. नवरात्रीनिमित्त मंदिरात जमलेल्‍या हिंदूंमध्‍ये दहशत निर्माण करण्‍याचा धर्मांधांचा प्रयत्न होता. (हिंदु समाज आणखी किती काळ धर्मांधांच्‍या दहशतीखाली वावरणार ? – संपादक) त्‍यामुळे त्‍यांनी मंदिराला चारही बाजूंनी घेरले होते. याचे लोण देशभरात पसरले. अमरावती येथे धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण केले. या वेळी ते ‘गुस्‍ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ (महंमद पैगंबर यांच्‍या अवमानाची एकच शिक्षा – शिर धडापासून वेगळे करणे) अशी घोषणा देत होते. त्‍यांनी रस्‍त्‍यावर दगडफेक चालू केली. यात ३० हून अधिक पोलीस कर्मचारी घायाळ झाले. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्‍याने पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्‍यासाठी अश्रूधुराच्‍या नळकांड्याही फोडल्‍या. २२ हून अधिक पोलिसांच्‍या वाहनांची तोडफोड करण्‍यात आली. सध्‍या अमरावतीत अतिरिक्‍त पोलीस बंदोबस्‍त करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • गाझियाबादमधील दहशतीची पुनरावृत्ती महाराष्‍ट्रात होणे, यावरून हे धर्मांधांचे पूर्वनियोजित षड्‍यंत्र असल्‍याचेच स्‍पष्‍ट होते !
  • महाराष्‍ट्रातील पोलीस आणखी किती काळ धर्मांधांची आक्रमणे झेलत रहाणार आहेत, हे त्‍यांनी एकदाचे सांगून टाकावे ! स्‍वतःचा धाक निर्माण करता न येणारा पोलीस प्रशासनाचा डोलारा हवाच कशाला ?