Himanta Biswa Sarma : भारताच्‍या कानाकोपर्‍यांत लपून बसलेल्‍या बाबरांना धक्‍के मारून बाहेर काढायचे आहे !

आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांचे निवडणूक प्रसारसभेत विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

पलवल (हरियाणा)  – हरियाणात काँग्रेसचे सरकार स्‍थापन झाल्‍यास पाकिस्‍तान झिंदाबादच्‍या घोषणा दिल्‍या जातील आणि काँग्रेसचे नेते मामन खान हिंदूंना हाकलून देतील, अशी चेतावणी आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांनी येथील एका प्रसारसभेत हिंदूंना दिली. ‘काँग्रेसने बाबराला पाळले आहे. आता देशाच्‍या कानाकोपर्‍यांत बाबर लपून बसले आहेत. या बाबरांना धक्‍के मारून देशाबाहेर काढायचे आहे. यासाठी भाजपला पुन्‍हा विजयी करायचे आहे’, असे आवाहनही त्‍यांनी केले.

सरमा म्‍हणाले की, इस्रायलने नसरूल्ला याला ठार केले, तेव्‍हा इंडी आघाडी रडत होती. सीमेवर आपले सैनिक वीरगतीला प्राप्‍त झाल्‍यावर हे लोक रडतात का ? मी मनापासून प्रार्थना करतो की, जगातून आतंकवाद संपायला हवा. आतंकवाद संपवण्‍यासाठी देव इस्रायलला आणखी शक्‍ती देवो. आम्‍ही शांतताप्रिय लोकांसमवेत आहोत. जे आतंकवादाला स्‍वतःचा धर्म मानतात त्‍यांच्‍यासमवेत नाही. देव इस्रायलला आणखी शक्‍ती देवो आणि देश-परदेशातील सर्व नसरूल्ला नष्‍ट होवोत. (प्रार्थना करण्‍यासह प्रत्‍यक्ष कृतीचीही आवश्‍यकता आहे. ‘भारत अशी कृती कधी करणार ?’ असा प्रश्‍न गेली अनेक दशके राष्‍ट्रप्रेमी हिंदूंच्‍या मनात आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

सरमा यांच्‍यासरखे प्रखर देशभक्‍त मुख्‍यमंत्रीच अशी वक्‍तव्‍ये करू शकतात. आजही कोट्यवधी बांगलादेशी मुसलमान घुसखोर, रोहिंग्‍या, तसेच पाकिस्‍तानी भारतात सुखेनैव रहात आहेत. त्‍यांना हाकलण्‍यासाठी केंद्र सरकार काय धोरणात्‍मक पावले उचलणार, हेही लोकांना कळायला हवे !