शासनाच्या नावाने खोटी प्रशस्तीपत्रके आणि आदेश काढणारे गट कार्यरत !

मुंबई – शासनाच्या नावाने खोटी प्रशस्ती पत्रके आणि खोटे शासनआदेश (जीआर्) काढणारे गट कार्यरत असल्याची माहिती उघड झाली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या नावे ‘महावाचन उत्सव २०२४’ या नावाखाली टंकलेखन, शुद्धलेखन, व्याकरण, आणि वाक्यरचना यांच्या एकूण २९ चुका असणारे एक प्रशस्तीपत्रक समाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आले. या पत्रकाविषयी प्रसारमाध्यमांत वृत्ते प्रसिद्ध झाली. दैनिक ‘सनातन प्रभात’नेही याचे वृत्त प्रसिद्ध केले; परंतु हे प्रशस्तीपत्रक खोटे असल्याचे लक्षात आले.