Yogi Adityanath On Pakistan: आतंकवादाला पाठिंबा देणार्‍या पाकचे ३ तुकडे होतील ! – उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ  

कठुआ (जम्‍मू) – आतंकवादाला पाठिंबा देण्‍यासाठी पाकिस्‍तानला किती किंमत मोजावी लागेल, हे पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांनाही ठाऊक आहे. यामुळे पाकिस्‍तानचे ३ तुकडे होऊ शकतात आणि त्‍याचे अस्‍तित्‍वही शिल्लक राहणार नाही, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी येथे निवडणुकीच्‍या प्रसारसभेत केले.

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर भारतात विलीन होण्‍यास सिद्ध !

मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले की, पाकव्‍याप्‍त काश्‍मीर भारतात विलीन होण्‍यास सिद्ध आहे. त्‍याला पाकिस्‍तानपासून स्‍वातंत्र्य हवे आहे. तेथील लोकांना विकास, रेशन, शांतता आणि आयुष्‍मान हेल्‍थ कार्ड हवे आहे; पण हे सर्व केवळ भारतातच शक्‍य आहे. पाकिस्‍तानची परिस्‍थिती अशी आहे की, तो भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. बलुचिस्‍तानही आता म्‍हणत आहे की, त्‍याला पाकिस्‍तानसमवेत रहायचे नाही; कारण त्‍यांना परदेशींसारखे वागवले जाते. जर कुणी पाकिस्‍तानच्‍या पाठिंब्‍याने भारतात आतंकवादाची बीजे पेरण्‍याचा प्रयत्न केला, तर त्‍याच्‍याकडे स्‍वत:ला झाकण्‍यासाठी कफनही (मृतदेह झाकण्‍यासाठी वापरलेले कापड) नसेल आणि स्‍वत:ला पुरण्‍यासाठी भूमीही नसेल.

सौजन्य:Times Now

संपादकीय भूमिका

आता भारतानेही इस्रायलप्रमाणे धडक कारवाई करून पाकिस्‍तानला जन्‍माची अद्दल घडवावी, असेच भारतियांना वाटते !