जगभरातील हिंदूंवर होणारे अत्याचार हे जिहाद्यांकडे दुर्लक्ष केल्याचेच फळ ?

सध्या बांगलादेशामध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत, तसेच साधारण वर्ष १९७० नंतर जिहादी उद्दाम, तर हिंदु धर्मीय तेवढेच निष्क्रीय झाले आहेत. काश्मीरमध्ये जेव्हा जिहाद्यांनी प्रारंभीला प्रयोग केला की, ‘हिंदूंचे सरसकट शिरकाण करायचे; पण त्याला मुलामा मात्र काश्मिरी पंडितांवर अत्याचार असा द्यायचा’, म्हणजे तेथेही परत जातीवर विभागले जाणे आणि मुलामा देण्ो, हे काम स्वतः हिंदूंनीच केले आहे.

१. हिंदूंच्या दुःस्थितीला हिंदूच कारणीभूत

हिंदु धर्मीय, तसेच इस्लामच्या अधिपत्याखाली आलेले प्रांत हे गेली १४०० वर्षे इस्लामिक जिहाद, अनेक प्रकारचे छळ, हालअपेष्टा, नरकयातना सहन करत आहेत. हा इतिहास असतांनाही मूर्ख हिंदू ‘मुसलमानांना क्षमा करा’, ‘जिहाद्यांशी मानवतेने वागा’, अशी भोळी आशा कशी काय बाळगात ? बाहेरून आलेल्या टिचभर मुसलमानांनी १ सहस्र वर्षे आणि मूठभर इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे कसे काय राज्य केले ? हिंदूंमध्ये तेव्हा विचारवंत नव्हते का ? होते ना ! स्वातंत्र्यपूर्व काळातही लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतियांना ओरडून ओरडून सांगितले; पण तरीही हिंदूंच्या डोक्यात कसलाच प्रकाश पडला नाही. हिंदू म. गांधींच्याच पाठीमागे गेले. सरदार पटेल यांना तत्कालीन काँग्रेसने एकमताने ‘पंतप्रधान’ म्हणून निवडून दिले होते; पण एकट्या म. गांधींनी ते मतदान नाकारले. नेहरूंना निवडून दिले. तेव्हा अन्य काँग्रेसी झोपले होते का? तेव्हा ते सगळे हिंदूच होते ना ? त्यांना ठाऊक नव्हते का की, याचा परिणाम पुढे काय होईल ? हिंदूंच्या आताच्या दु:स्थितीला हिंदू स्वतःच कारणीभूत आहेत आणि अन्य कुणीही नाही.

२. हिंदूंना कर्मफलन्याय भोगावा लागत आहे का ?

बाटलेले हिंदू ज्यांनी इस्लाम स्वीकारला, तेच आज काश्मीरमध्ये जिहादी म्हणून हिंदूंचाच गळा कापत आहेत, म्हणजेच तत्कालीन हिंदूंनी परकीय आक्रमकांना तीव्र विरोध न केल्याने कर्मफलन्याय भोगावा लागत आहे का ? असा प्रश्न पडतो. जसे पूर्वी यवनी आक्रमणात अनन्वित अत्याचार झाले, तसेच आताही होत आहेत आणि या पुढेही आणखी भयानक अत्याचार होतील, असे वाटते. या अत्याचारांकडे हिंदू कानाडोळा करत आहेत आणि याचे पाप त्यांना भोगावे लागेल !

– श्री. अमित दातेकर, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.