नाम घेतले की, भगवंत त्यामागे येतो !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. वासरू घेऊन गेल्यावर जशी गाय पाठीमागून आपोआप येते. त्याप्रमाणे नाम घेतले की, भगवंत त्यामागे येतो. एकदा त्याचे होऊन राहिले, म्हणजे तोच सर्व उपाय काढतो.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज