Sadguru Jaggi Vasudev : हिंदूंची मंदिरे आता भक्‍तांनीच चालवायला हवीत ! – सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव

सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांची मागणी

चेन्‍नई (तमिळनाडू) – भक्‍त ग्रहण करत असलेल्‍या मंदिराच्‍या प्रसादात गोमांसाची चरबी आढळणे हे किळस येण्‍यापलीकडचे आहे. त्‍यामुळे मंदिरांची देखभाल सरकारी प्रशासनाने नव्‍हे, तर भक्‍तांनी केली पाहिजे.

जिथे भक्‍ती नाही, तिथे पावित्र्य राखले जात नाही. आता वेळ आली आहे की, हिंदूंची मंदिरे सरकारी प्रशासनाद्वारे नव्‍हे, तर हिंदु भक्‍तांनी चालवायला हवीत, अशी मागणी सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांनी तिरुपती मंदिराच्‍या लाडवांच्‍या प्रकरणानंतर ‘एक्‍स’वर पोस्‍ट करून केली आहे.