वर्ष २०२४ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !
१. विविध शक्ती आणि त्यांच्या व्याख्या
१ अ. मनःशक्ती : ‘ज्या वेळी एखादे ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्ती स्वेच्छेने कृती करते, त्या वेळी कार्यरत होणारी शक्ती म्हणजे ‘मनःशक्ती’, उदा. क्रांतीकारक भगत सिंग, खेळाडू सचिन तेंडुलकर, नेते इत्यादी.
१ आ. चित्तशक्ती : ज्या वेळी एखादे ध्येय साध्य करतांना व्यक्ती परेच्छेने किंवा धर्मनियमानुसार वागते, त्या वेळी कार्यरत होणारी शक्ती म्हणजे ‘चित्तशक्ती’, उदा. लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद इत्यादी.
१ इ. आत्मशक्ती : ज्या वेळी एखादे ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्ती ईश्वरेच्छेने वागते, त्या वेळी कार्यरत होणारी शक्ती म्हणजे ‘आत्मशक्ती’, उदा. छत्रपती शिवाजी महाराज.
५० टक्क्यांहून अल्प आध्यात्मिक पातळी असलेले जीव मनःशक्तीच्या, ५० ते ७० टक्के आध्यात्मिक पातळी असलेले जीव चित्तशक्तीच्या, तर ७१ टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले जीव आत्मशक्तीच्या स्तरावर कार्य करतात.
२. वर्ष २०२४ पूर्वी झालेल्या आणि वर्ष २०२४ मध्ये झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात उपस्थित हिंदुत्वनिष्ठ अन् त्यांच्या शक्तीचा स्तर (टक्के)
वर्ष २०२४ च्या पूर्वी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनां’त किंवा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवां’त चित्तशक्ती आणि आत्मशक्ती यांच्या एकूण (३० + १० = ४० टक्के) स्तरावर कार्य करण्याच्या तुलनेत मनःशक्तीच्या (६० टक्के) स्तरावर कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ अधिक सहभागी होते, याउलट वर्ष २०२४ मध्ये झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त मनःशक्तीच्या (४५ टक्के) तुलनेत चित्तशक्ती आणि आत्मशक्ती यांच्या एकूण (४० + १५ = ५५ टक्के) स्तरावर कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ अधिक प्रमाणात सहभागी झाले होते.
३. हिंदुत्वनिष्ठांना मनःशक्तीच्या स्तराकडून चित्तशक्तीच्या स्तरावर नेणारा महोत्सव
‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ किंवा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ यांत हिंदुत्वनिष्ठांना त्यांची प्रकृती आणि आवड यांनुसार साधना करण्यास सांगितले जाते. या नियमित प्रबोधनामुळे हळूहळू काही हिंदुत्वनिष्ठ साधनेचे चांगले प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मनःशक्तीकडून चित्तशक्तीच्या स्तरावर जाण्यास साहाय्य होते.
४. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात हिंदुत्वनिष्ठांनी नामजप केल्याने होणारे परिणाम
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात विविध सत्रे चालू करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा ध्वनीमुद्रित सात्त्विक नामजप काही काळासाठी लावण्यात येतो. हिंदुत्वनिष्ठांनी हा नामजप केल्यावर त्यांचा मनःशक्तीपासून चित्तशक्तीच्या टप्प्याला प्रवास होतो. त्यामुळे पुढील लाभ होतात.
अ. सभागृहाच्या सात्त्विकतेत वाढ झाल्याने अनिष्ट शक्तींना वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहजतेने अडथळे आणता येत नाहीत.
आ. हिंदुत्वनिष्ठांच्या सात्त्विकतेत वाढ झाल्याने त्यांना सहजतेने अनुभूती येण्यास साहाय्य होते.
इ. व्यक्ती आणि वायूमंडल यांच्या सात्त्विकतेत वाढ झाल्याने विषयाचे प्रस्तुतीकरण अन् श्रोत्यांना त्याचे आकलन सहजतेने होते.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक आणि वेळ : २४.६.२०२४, सकाळी १०.३० (१ मिनिट), ज्ञानाच्या टंकलेखनाचा दिनांक आणि वेळ : २९.६.२०२४, सकाळी ११.५० ते दुपारी १२.१५)
|