स्वामीभक्तांचा २० सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची मागणी

श्री स्वामी समर्थ

कोल्हापूर – श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अनुद्गार काढणारे ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी शुक्रवार, २० सप्टेंबर या दिवशी शहर आणि जिल्ह्यातील स्वामीभक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा दसरा चौक येथून सकाळी १०.३० वाजता प्रारंभ होईल. तरी अधिकाधिक स्वामीभक्त आणि हिंदु भाविक यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामीभक्तांनी १८ सप्टेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले. या पत्रकार परिषदेला अरुण गवळी, कुलदीप जाधव, सुहास पाटील, रमेश चावरे, धनंजय महिंद्रकर, गुरुदेव स्वामी, अमोल कोरे, प्रकाश सरनाईक आदी उपस्थित होते.