वास्तूशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

‘एका साधकाकडे १९.८.२०२३ या दिवशी वास्तूदोष निवारणार्थ रत्नसंस्कार विधी करण्यात आला. या विधीचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मीटरमध्ये मोजता येते. रत्न संस्कार विधी केल्याने वास्तूवर सकारात्मक परिणाम होतात, हे या संशोधनातून सिद्ध झाले. या संशोधनांतर्गत केलेल्या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

१. आध्यात्मिक स्तरावरील उपाय (टीप) केल्याने रत्नांवरील त्रासदायक (काळ्या) स्पंदनांचे आवरण नाहीसे होऊन सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ होणे

श्री धनंजय कर्वे

कलियुगातील वातावरण रज-तमप्रधान असल्याने रत्नांवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण असते. त्यामुळे रत्नांवर आध्यात्मिक उपाय करून त्यांची शुद्धी करून मगच त्यांचा उपयोग विधीत करावा.

२. रत्न संस्कार विधी केल्यावर भूमीतील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन भूमीत पुष्कळ सात्त्विकता निर्माण होणे

सौ. मधुरा कर्वे

रत्न संस्कार विधी करण्यापूर्वी घरातील प्रत्येक दिशेकडील भूमीची निरीक्षणे करण्यात आली. तेव्हा भूमीत सकारात्मक स्पंदने काहीच नसून पुष्कळ नकारात्मक स्पंदने आढळून आली. रत्न संस्कार विधी केल्यानंतर मात्र भूमीतील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन भूमीत पुष्कळ सात्त्विकता निर्माण झाली. रत्न संस्कार केलेल्या प्रत्येक दिशेची निरीक्षणे पुढील सारणीत दिली आहेत.

३. रत्नसंस्कार विधीमुळे घरातील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन घरामध्ये पुष्कळ सात्त्विकता निर्माण होणे

‘रत्नसंस्कार विधीचा घरावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी विधीपूर्वी आणि विधीनंतर घराची छायाचित्रे काढून त्यांची निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांतून लक्षात आले की, विधीपूर्वी घरात सकारात्मक ऊर्जा काहीच नसून ७४१.५० मीटर नकारात्मक ऊर्जा होती. विधीनंतर मात्र घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन घरात ३६१.५० मीटर एवढी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. थोडक्यात ज्या उद्देशाने घरात रत्न संस्कार विधी करण्यात आला, तो सफल झाला. हे संशोधन श्रीगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने यशस्वी झाले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. धनंजय कर्वे, वास्तू अभ्यासक, फोंडा, गोवा आणि सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.८.२०२३)

  • टीप : चाचणीतील रत्नांना सात्त्विक उदबत्तीचा धूर दाखवणे, त्यांवर विभूती फुंकरणे, संतांची भजने लावणे (रत्नांजवळ संतांच्या स्वरातील भजने लावल्याने ती संतांच्या चैतन्याने भारित होतात.) इत्यादी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ – या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक