श्री शिवतीर्थाचा ३०० मीटर परिसर ‘शांतता परिसर’ म्हणून घोषित करा ! – विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांचे निवेदन

इचलकरंजी महापालिकेत उपायुक्त काटकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांचे कार्यकर्ते

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील श्री शिवतीर्थ  हे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आणि पवित्रस्थळ आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या मिरवणुकीत ‘डॉल्बी’चा (मोठ्या आवाजाच्या ध्वनीवर्धकाचा) वापर केला जातो. यामुळे श्री शिवतीर्थाच्या बांधकामास इजा पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी यामुळे बांधकामास इजा न होण्यासाठी श्री शिवतीर्थच्या चारही बाजूंनी किमान ३०० मीटर परिसर शांतता परिसर म्हणून घोषित करावा, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने इचलकरंजी महापालिकेत उपायुक्त काटकर यांना देण्यात आले.

या प्रसंगी सर्वश्री सुजीत कांबळे, रविकिरण हुक्कीरेकर, प्रवीण सामंत, सर्जेराव कुंभार, रोहित घाडगे, युवराज कमीतनुरे, अमित कुंभार उपस्थित होते.