‘हनुमान जयंती’च्या दिवशी साधकाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ‘प्रभु श्रीराम’, तर सनातनचे संत पू. सौरभ जोशी ‘हनुमंत’ आहेत’, याविषयी जाणवलेली सूत्रे

‘२३.४.२०२४ या दिवशी, म्हणजे ‘हनुमान जयंती’च्या दिवशी पूजा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्याविषयी पुढील सूत्रे जाणवली.

पू. सौरभ जोशी

१. सतत नामजप करणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे ‘प्रभु श्रीराम’ आहेत, तर पू. ‘सौरभदादा’ हनुमंत आहेत. हनुमंतराया सतत प्रभु श्रीरामाचा नामजप करत असे, तसे पू. सौरभदादा सतत नामजप करत असतात.

श्री. रवींद्र कुंभार

२. साधकांचे रक्षण करणे

हनुमंतराया प्रभु श्रीरामाचा नामजप करत सर्वांचे रक्षण करतो, तसे पू. सौरभदादा वाईट शक्तींच्या त्रासांपासून सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सतत ध्यानमग्न असतात. प्रभु श्रीरामाचे स्मरण केल्यावर हनुमंतराया रक्षणासाठी येतो, तसे साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे स्मरण केल्यावर त्यांच्या रक्षणासाठी पू. सौरभदादा सूक्ष्मातून येतात.

३. साधकांच्या प्राणाचे रक्षण करणे

हनुमंताने लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी बुटी आणली, तसे पू. सौरभदादा सर्व साधकांच्या प्राणाचे रक्षण व्हावे, यासाठी नामजपरूपी संजीवनी बुटीच्या माध्यमातून अनिष्ट शक्तींशी सूक्ष्मातून लढत असतात.

४. प्रभु श्रीरामाच्या नामाने हनुमंताला आनंद होतो, तसे ‘श्रीं’चे(टीप) नाव घेतल्यावर पू. सौरभदादांना आनंद होतो.

‘हनुमान जयंती’च्या निमित्ताने पू. सौरभदादांच्या चरणी साष्टांग दंडवत !’

(टीप : पू. सौरभदादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ‘श्री’ असे म्हणतात.)

– श्री. रवींद्र कुंभार, तासगाव, जि. सांगली. (२३.१.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.