…अन्यथा हे काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना करावे लागेल ! – मिलिंद एकबोटे, समस्त हिंदु आघाडी’

‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’मध्ये सहभागी हिंदु बांधव

वडगाव मावळ (पुणे) – बांगलादेशी घुसखोरांपासून देशाला मोठा धोका आहे. त्यासाठी सर्वांनी जागरूक रहाण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी येथे बेकायदेशीररित्या रहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांची पाठवणी बांगलादेशात करावी; अन्यथा हे काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना करावे लागेल, अशी चेतावणी समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी दिली. बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ ‘मावळ तालुका सकल हिंदु समाजा’च्या वतीने २९ ऑगस्टला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढला होता. या वेळी पंचायत समिती चौकामध्ये कोपरा सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

या मोर्चामध्ये हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले, सुनील बेनगुडे, नंदकुमार शेटे यांसह अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार विक्रम देशमुख यांना समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.