देशात ‘मुस्लिम कुर्बानी सेंट्रल बोर्ड’ स्थापन केले जावे ! – Maulana Tauqeer Raza

  • ‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांचे मुसलमानांना आवाहन

  • बोर्डद्वारे इस्लामसाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करणार्‍यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न !

मौलाना तौकीर रझा

मुंबई – देशात ‘मुस्लिम सेंट्रल बोर्ड’ स्थापन केले जावे, ज्यामध्ये त्यागाची आवड असलेल्या लोकांचा समावेश असावा. या बोर्डाचा निर्णय सर्व मुसलमानांनी बंद डोळ्यांनी स्वीकारावा, अशी मागणी ‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी येथे एका कार्यक्रमात केली. या वेळी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यासह अनेक नेते आणि मुसलमान धर्मगुरु उपस्थित होते. ‘मुस्लिम लीडरशिप समिट २०२४’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. याच्या अध्यक्षस्थानी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी नदवी हे होते. ‘मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मुसलमानांना २ क्रमांकाचे नागरिक बनवले जात आहे !

तौकीर रझा पुढे म्हणाले की, मुसलमानांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची चिंता करावी. मुसलमानांना देशात २ क्रमांकाचे नागरिक बनवले जात असल्याचा आरोप होत आहे. देशात मुसलमानांना मान आणि प्रतिष्ठा नाही, याचे त्यांना दु:ख आहे. मुसलमानांवर  लव्ह जिहादचा आरोप होतो, याचे त्यांना अत्यंत दु:ख आहे आणि हा देश दायित्वशून्य लोकांच्या हातात गेल्याचे सर्वाधिक दु:ख आहे.

शिया धर्मगुरूंनी रझा यांना प्रत्येक मुसलमानाच्या घरी जाण्याचा दिला सल्ला !

शिया (मुसलमानांतील एक संप्रदाय) धर्मगुरु सैफ अब्बास यांनी तौकीर रझा यांच्या वक्तव्यावर टीका करत म्हटले की, ते जे बोलत आहेत, ते बरोबर आहे; पण आधी त्यांनी स्वतः पुढे यावे आणि मुसलमानांच्या प्रत्येक घरात जावे आणि मगच बोलावे. हे खरे आहे की, सध्या मुसलमानांना एक नेता नाही आणि केवळ एकच नेता असू शकत नाही. लव्ह जिहाद अस काहीही नाही. (असे आहे तर मग मुसलमान युवक हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतांना स्वतःचे खरे नाव लपवून हिंदु नावा का सांगतात ? हिंदु युवतीचे धर्मांतर का करतात ? तिच्याशी बलपूर्वक विवाह का करतात ? आदी प्रश्‍नांविषयी अब्बास गप्प का ? असे कृत्य करणार्‍या मुसलमान युवकांना ते हटकत का नाहीत ? – संपादक)

इस्लामी राष्ट्र मानणार्‍यांना राज्यघटनेच्या मर्यादेत रहाण्याविषयी शिकवले जाईल ! – भाजपची चेतावणी

तौकीर रझा यांच्या १०० पिढ्या आल्या, तरी भारतात ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण करणे) होणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भारताला इस्लामी राष्ट्र मानणार्‍यांना राज्यघटनेच्या मर्यादेत रहाण्याविषयी शिकवले जाईल. देशातील मुसलमानांना चिथावणी देणारे तौकीर रझा हे सर्वांत दायित्वशून्य आहेत. अशा लोकांवर राज्यघटनेच्या कक्षेत राहून कारवाई केली जाईल.

तौफीर रझा यांनी यापूर्वी केलेली आक्षेपार्ह विधाने !

१. तौकीर रझा यांनी ज्ञानवापीविषयी म्हटले होते की, अयोध्या प्रकरणावरील सर्व खोटे बोलणे सहन केले; पण आता ते सहन करणार नाही. कारंज्याला शिवलिंग मानून कायदा आणि धर्म यांची खिल्ली उडवली जात आहे.

२. वर्ष २०२२ मध्ये झालेल्या एका सभेत रझा यांनी चेतावणी देतांना म्हटले होते की, ज्या दिवशी मुसलमान तरुणांना कायदा हातात घेण्यास भाग पाडले जाईल, त्या दिवशी हिंदूंना भारतात कुठेही लपायला जागा मिळणार नाही.

३. वर्ष २००७ मध्ये बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या विरोधात फतवा काढला होता. त्यांनी ‘जो कुणी तस्लिमा यांचा शिरच्छेद करेल, त्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल’, असे घोषित केले होते.

(अशा धर्मांध नेत्याला अद्याप अटक करून कारागृहात का डांबले गेले नाही ?  बांगलादेश, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत मुसलमानांच्या विरोधात एकतरी हिंदु नेता बोलू शकतो का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांचे तथाकथित धार्मिक नेते भारतात जिहाद करण्यासाठीच अशा प्रकारच्या बोर्डाच्या स्थापनेची उघडपणे मागणी करतात, तर हिंदूंना याविषयी काहीच ठाऊक नसते, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • जमात-ए-इस्लामी ही संघटना सध्या बांगलादेशात हिंदूंच्या संदर्भात जे करत आहे, ते पुढे कुर्बानी बोर्डच्या माध्यमातून भारतातील हिंदूंच्या संदर्भात झाल्यास आश्‍चर्य वाटू नये. त्यापूर्वीच हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे !