नोकरीसाठी केवळ अमराठींनाच बोलावले !

मुंबईतील आर्या गोल्‍ड आस्‍थापनाचा उद्दामपणा आणि मराठीद्वेष्‍टेपणा !

मुंबई – अंधेरी येथील मरोळनाका येथील ‘आर्या गोल्‍ड’ या आस्‍थापनाने नोकरीसाठी काढलेल्‍या विज्ञापनामध्‍ये केवळ ‘नॉन महाराष्‍ट्रीयन नागरिकांसाठी’ असा उल्लेख केला आहे. या प्रकरणी महाराष्‍ट्रातील नागरिकांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्‍हटले, ‘‘अशा आस्‍थापनांवर सरकारचा वचक असायला हवा. अशा आस्‍थापना सरकारला जुमानत नसतील, तर ज्‍यांची वीजजोडणी, पाणी बंद करा. महाराष्‍ट्रात राहून अशा प्रकारचे विज्ञापन देण्‍याचे धारिष्‍ट्य कशामुळे आले आहे, हे पहायला हवे. कोणतेही सरकार असले, तरी अशा लोकांवर कारवाई व्‍हायला हवी.’’

संपादकीय भूमिका 

प्रांतभेद करणार्‍या आणि महाराष्‍ट्रात राहून मराठी नागरिकांना डावलणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !