कल्याण येथे दरड कोसळली !

नोटीस मिळूनही नागरिकांचे स्थलांतर नाही !

कचोरे टेकडीचा काही भाग कोसळला

ठाणे – १५ जुलै या दिवशी दुपारच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीचा काही भाग कोसळला. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

नेतिवली टेकडीवरील दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात प्रतिवर्षी घडतात. त्यामुळे यापूर्वीच नेतिवली टेकडी, कचोरे टेकडी, तसेच वालधुनी परिसरातील १४० नागरिकांना स्थालांतरणाच्या नोटिसा कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत; मात्र ‘पर्यायी व्यवस्था नसल्या’चे सांगत ही कुटुंबे आजही मृत्यूच्या छायेत जगत आहेत. येथील ६ कुटुंबांचे महापालिकेच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले आहे.