कवी नारायण सुर्वे यांच्या घरी चोरलेला माल परत करून चोराची क्षमायाचना !

कवी नारायण सुर्वे

मुंबई – मराठीतील सुप्रसिद्ध आणि आता हयात नसलेले कवी नारायण सुर्वे यांच्या मुलीच्या घरी नेरळ येथे चोराने चोरी केली; परंतु जेव्हा त्याला समजले की, हे कवी नारायण सुर्वे यांचे घर आहे, तेव्हा त्याने चोरलेली वस्तू परत ठेवून क्षमायाचना करणारी चिठ्ठी तिथे लिहून ठेवली. त्यांचे मोठे छायाचित्र या घरात लावले होते.

नारायण सुर्वे स्वतः कष्टकरी वर्गातून वर आले होते. त्यांनी कष्टकरी वर्गाचे दुःख त्यांच्या कवितांतून मांडले होते. वर्ष २०१० मध्ये त्यांचे निधन झाले आहे.