सर्वधर्मसमभावी आणि संकुचित हिंदू !

श्री. अशोक लिमकर

ज्या परिसरामध्ये धर्मांधांची संख्या अधिक असते, तेथे त्यांचाच ‘कारभार’ आणि ‘अधिकार’ चालतो. तिथे हिंदूंना दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. ते सांगतील तसे हिंदूंना वागावे लागते; नाहीतर आक्रमणाला किंवा मरणाला तोंड देण्यास सिद्ध व्हावे लागते. सर्व संपत्ती सोडून पळून जावे लागते. तरच त्यांचा जीव वाचतो. मठ-मंदिरांवर जमावाने आक्रमणे केली जातात. मूर्तींची तोडफोड होते. पुजार्‍यांना मारून टाकले जाते. हिंदूंच्या मिरवणुकांवर किरकोळ कारणास्तव शस्त्रांसह पूर्वनियोजित आक्रमणे केली जातात. संख्येने अधिक असूनही हातात शस्त्रे नसल्यामुळे हिंदूंना जीव वाचवण्यासाठी तेथून पलायन करावे लागते. असेच वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये झालेले होते. अशाच प्रकारच्या छोट्या-मोठ्या अनेक घटना भारतात सर्वत्र होत आहेत. त्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत इतकेच ! जरी अशा बातम्या पोचल्या, तरी हिंदू संघटित होऊन त्याला प्रतिकार करत नाहीत. तेथे त्यांची सहिष्णु आणि संकुचित वृत्ती आड येते. ‘कशाला प्रकरण वाढवायचे ? गप्प बसूया’, असे म्हणून पुन्हा पुन्हा अशा प्रसंगांना मूकपणे तोंड देत रहातात. मुसलमान मात्र त्यांच्या धर्माला चिकटून रहातात. ते कधीही हिंदूंच्या मठ-मंदिरात जात नाहीत किंवा पूजा करत नाहीत; मात्र हिंदू नेहमी पीराची पूजा करतात. मुसलमान फकिरांचा आशीर्वाद घेतात. त्यांचे रोजे (उपवास) करतात. गोल टोपी घालून ‘इफ्तार’ मेजवानीला जातात. एवढेच नाही, तर काही ठिकाणी मठ-मंदिरामध्ये इफ्तार मेजवानीचे आयोजन करून ती भ्रष्ट करतात. यामध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करणारे जन्माने हिंदु असलेले राजकीय नेते मोठा सहभाग घेतात. येथेच हिंदूंचा सर्वधर्मसमभाव नडतो. ‘ते कसे का वागेनात, आपण त्यांच्याशी चांगले वागूया’, या मनोवृत्तीमुळे धर्मांधांचे आणखी फावते. ते आणखी अत्याचार करतात. उद्या आपल्यावरही ही वेळ येऊ शकते, हे प्रत्येक हिंदूने लक्षात घेऊन धर्मांध आक्रमकांचा प्रतिकार करण्यासाठी संघटित झाले पाहिजे !

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.७.२०२४)