श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्य रेल्वेकडून ६४ विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – आषाढी यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरज यांसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या सोडणार आहे. यामध्ये मिरज-पंढरपूर विशेष पॅसेंजर रेल्वे (२० सेवा), नागपूर-मिरज विशेष (२ सेवा), अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा), लातूर-पंढरपूर विशेष (१० सेवा), भुसावळ-पंढरपूर विशेष (२ सेवा) या गाड्यांचा यात समावेश आहे.

गाडी क्रमांक ०११०७ विशेष पॅसेंजर रेल्वे मिरज येथून १२ ते २१ जुलै या कालावधीत सकाळी ५ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी सकाळी ७.४० वाजता पोचेल. गाडी क्रमांक ०११०८ विशेष पॅसेंजर रेल्वे पंढरपूर येथून १२ ते २१ जुलै या कालावधीत सकाळी ९.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी दुपारी १.५० वाजता पोचेल.