मुंबईतील मरिन ड्राईव्हच्या रस्त्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, बूट आणि चपला यांचा खच !

  • रात्रभर राबवली स्वच्छता मोहीम  !

  • विश्‍वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमले होते लाखो लोक !

मरिन ड्राईव्हच्या रस्त्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, बूट आणि चपला यांचा खच

मुंबई – टी-२० क्रिकेट विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा मरिन ड्राईव्ह परिसरात ४ जुलैला पार पडला. या वेळी लाखो मुंबईकर तेथे जमले होते. या सर्वांनी खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, बूट, चपला आणि इतर वस्तू तेथेच टाकल्याने रस्त्यावर पुष्कळ कचरा साठला होता. हा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेला २ मोठे डंपर आणि ५ लहान जीप यांचा वापर करावा लागला. रात्री ११.३० वाजल्यापासून चालू झालेली ही स्वच्छता मोहीम ५ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत चालूच होती. यात १०० हून अधिक कामगारांना श्रम करावे लागले.

संपादकीय भूमिका

  • स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम आहे !
  • ‘आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवे, तेथे कचरा करू नये’, या साध्या गोष्टीचीेही जाण नसणे भारतियांना लज्जास्पद !