सनातन धर्मीय संघटित झाल्यास धर्म बलवान होऊ शकतो ! – जगद्गुरु श्री श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी महाराज, दक्षिणाम्नाय शृंगेरी श्री शारदा पीठाधीश्वर

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांचे आशीर्वाद !

जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज

रामनाथी (गोवा), २४ जून (वार्ता.) – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला जगद्गुरु श्री श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी महाराज यांनी आशीर्वाद दिले आहेत.

ते म्हणाले,

‘‘सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे; मात्र लोकांना धर्माचे सखोल आणि योग्य ज्ञान नसल्यामुळे काही जण त्याला विरोध करतात. त्यामुळे सनातन धर्मियांमध्ये धर्माविषयी संदेह निर्माण होतो. यासाठी हिंदूंना सनातन धर्माचे ज्ञान देण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्मीय संघटित झाले, तर सनातन धर्म बलवान होऊ शकतो.

देश-विदेशात अशा प्रकारची अधिवेशने झाली पाहिजेत. या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातून देश आणि धर्म यांविषयी चिंतन होऊन योग्य निर्णय घेतले जावेत, यासाठी आम्ही भगवान नारायणाला स्मरून आशीर्वाद देत आहोत, तसेच या धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी सर्व संघटनांनाही आमचे आशीर्वाद आहेत.’’