आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’ ५ सहस्र विशेष गाड्या सोडणार !

मुंबई – आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणार्‍या भाविक प्रवाशांसाठी ‘एस्.टी.’ने ५ सहस्र विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून ‘एस्.टी.’ बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.