विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेची उणीव भरून काढू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आमच्या काही जागा न्यून झाल्या. बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजप स्वबळावर ३१० च्या पुढे गेला असता. देशातील जनतेने भक्कमपणे माननीय मोदी यांना साथ दिली आहे. या निकालाचे सखोल चिंतन करून विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन या लोकसभेची उणिव भरून काढू, अशी भावना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ खात्यावर व्यक्त केली.