शहापूर (कल्याण) येथील गावांमध्ये ‘जिओ नेटवर्क’ची अडचण !

कल्याण – शहापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये ‘जिओ नेटवर्क’च मिळत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिकांनी याविषयीच्या सर्वाधिक तक्रारी केल्या आहेत. भ्रमणभाषवर बोलत असतांना अचानक संपर्क तुटतो. चांगली रेंज मिळण्यासाठी गावाबाहेर उंच टेकडीवर जावे लागते. नेटवर्कअभावी ऑनलाईन व्यवहार खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

संपादकीय भूमिका

प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही अडचण तात्काळ सोडवायला हवी !