भाजपला फटका बसला ! – एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

मुंबई – महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण मतदारांनी अमान्य केले आहे. याचा फटका भाजपला बसतांना दिसत आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे का ? या पत्रकारांच्या प्रश्नावर एकनाथ खडसे यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतला. उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. मूळ पक्ष ज्यांचा आहे, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांच्या हातून ते अन्यांच्या हातात जाणे हा फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम आहे. यामुळे या निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अधिक प्रतिसाद दिसत नाही.’’