महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या ५ व्या टप्प्याचे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान !

मुंबई – महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या ५ व्या टप्प्यात १३ मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान झाले. यामध्ये भिवंडीमध्ये ४८.८९ टक्के, धुळे ४८.८१, दिंडोरी ५७.०६, कल्याण ४१.७०, मुंबई उत्तर ४६.९१, मुंबई उत्तर-मध्य ४७.३२, मुंबई उत्तर-पूर्व ४८.६७, मुंबई उत्तर-पश्चिम ४९.७९, मुंबई दक्षिण ४४.२२, मुंबई दक्षिण-मध्य ४८.२६, नाशिक ५१.१६, पालघर ५४.३२ आणि ठाणे लोकसभा मतदान संघात ४५.३८ टक्के इतके मतदान झाले.