रामराज्यात निःष्पक्ष न्यायदान असणे

‘ऋषिमंडलाचा न्यायदानाविषयी अत्यंत कटाक्ष असे. रामराज्यात लक्ष्मणालाही शिक्षा भोगावी लागली. स्वार्थ, आपमतलबीपणा, चारित्र्यहीनता इत्यादींसारखे दोष रामराज्यात राज्याधिकार्‍यांच्या मधे औषधालाही शोधून सापडत नसत; म्हणून आज लोकांना रामराज्याची तळमळ लागली आहे.’

(साभार : ग्रंथ ‘भारतियांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)