‘वंदे भारत’मध्ये १ लिटरऐवजी अर्धा लिटरची पाण्याची बाटली मिळणार !

वंदे भारत रेल्वे

मुंबई – वंदे भारतमध्ये यानंतर ‘रेलनीर’च्या १ लिटर पाण्याच्या बाटलीऐवजी अर्धा लिटरची बाटली दिली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतून सुटणार्‍या गांधीनगर, कर्णावती, सोलापूर, शिर्डी, मडगाव, जालना या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी ५०० मिलीची पाण्याची बाटली उपलब्ध असेल.

प्रवाशांनी अतिरिक्त पाण्याच्या बाटलीची मागणी केल्यास त्याला अधिकची ५०० मिलीची पाण्याची बाटली कोणतीही अतिरिक्त रक्कम न आकारता देण्यात यावी. दुसरी रेलनीरची बाटली विनामूल्य द्यावी, अशी सूचना रेल्वे मंडळाने ‘आय.आर्.सी.टी.सी.’ला दिली आहे.