छत्तीसगडमध्ये सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार !

रायपूर (छत्तीसगड) – राज्यातील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण अलसेला यांनी सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानात असतांना कोयलीबेडा भागातील जंगलात ही चकमक झाली.

त्या पुढे म्हणाल्या की, चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि दोन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत अन् कारवाई अजूनही चालू आहे.