सोलापूर येथे वक्फ कार्यालय होऊ नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन !

सोलापूर – येथे वक्फ बोर्डाच्या नावाखाली अनेक भूखंडांवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणामुळे अनेक कुटुंबे आणि सरकारी कार्यालये अडचणीत आलेले आहेत. सोलापूर येथे वक्फचे कार्यालय चालू झाले, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अशी कोणतीही अनुमती देऊ नये, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी सोलापूर येथे येत्या १५ दिवसांत वक्फ कार्यालय चालू होणार असल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केल्यानंतर सकल हिंदु समाजाने हे निवेदन दिले आहे. या वेळी हिंदू महासभा, विश्व हिंदु परिषद, हिंदुराष्ट्र सेना, अखिल भारत कृषी गोसेवा संघ, ॐ काली संघटना, ॐ साई प्रतिष्ठान इत्यादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

हिंदूबहुल महाराष्ट्रात वक्फ कार्यालय होऊ नये, यासाठी निवेदन देण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठांवर येणे दुर्दैवी !