सत्त्व, रज आणि तम यांचे महत्त्व

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘गुरुदेव, आपण आपले सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण भगवंताकडे लावण्याकरता प्रतिदिनचा नेम लावून घेतला आहे. आपली प्रत्येक क्रिया भगवत्प्राप्तीकरता घडेल, अशी ठेवली. या तिन्ही गुणांचे, म्हणजेच स्वतःतील ३ गुणांचे उदात्तीकरण होते. तिन्ही गुण उदात्तहोतात. भगवंताकडे पोचवतात. आपण या तिन्ही गुणांचा चतुराईने वापर करता कि त्यांचा स्पर्श होऊ देत नाही ? साक्षीत्व सांभाळता ? साक्षीत्वाकरताच त्रिगुणांचा वापर अथवा त्रिगुणांकरता साक्षीत्व दोन्ही एकच !’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२२)