ठाणे येथे विजेचा धक्का लागून ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, ३१ डिसेंबर (वार्ता.) – येथील वागळे इस्टेट भागातील वीर सावरकरनगर परिसरातील चाळीत अलोक चकवे या ११ वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला. तो घराबाहेर आल्यावर त्याचा हात लोखंडी जिन्याला लागला. त्यातून त्याला विजेचा धक्का लागून तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात भरती केले असता मृत घोषित करण्यात आले. या प्रकाराची नोंद वर्तकनगर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका :

या प्रकरणात उत्तरदायी असणार्‍यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी !