शिर्डी (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ४८ गोवंशियांची सुटका !

  • गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता सांगणारी घटना !

  • २ धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद !

प्रतीकात्मक छायाचित्र

शिर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – कोपरगाव येथील राजु ईनामदार आणि तन्वीर सय्यद यांच्या घराजवळ असणार्‍या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरता गोवंशियांना बांधून ठेवले आहे, अशी माहिती २३ डिसेंबर या दिवशी शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी धाड टाकून १ लाख २० सहस्र रुपये किमतीच्या ४८ गोवंशियांना कह्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.