रत्नागिरीत ७ नोव्हेंबर या दिवशी आंबा बागायतदारांसाठी मेळावा


रत्नागिरी – कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये आंबा पिकावरील रोग-किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, आंबा पिकांसाठी मानांकन नोंदणी प्रमाणपत्र इ. विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील शास्त्रज्ञ आंबा पिकावरील कीड-रोगावरील उपाय योजनेसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक आंबा बगायतदारांनी मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे यांनी केले आहे.