शेतकरी दांपत्‍याची हत्‍या

सातारा, ९ ऑक्‍टोबर (वार्ता.) – माण तालुक्‍यातील आंधळी गावात संजय पवार आणि सौ. मनीषा संजय पवार या शेतकरी दांपत्‍याची अज्ञात आक्रमणकर्त्‍यांनी हत्‍या केली. हे दांपत्‍य पिकांना पाणी देण्‍यासाठी रात्री १० नंतर शेतात गेले होते. या वेळी अज्ञातांनी दोघांचे डोके, गळा आणि मान यांवर धारदार शस्‍त्राने आक्रमण करून त्‍यांची हत्‍या केली. सकाळी शेतात आलेल्‍या लोकांना दोघांचेही मृतदेह रक्‍ताच्‍या थारोळ्‍यात पडलेले दिसले.