मोतिहारी (बिहार) येथे गणपति विसर्जनाच्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आम्ल फेकले !

३ हिंदू घायाळ !

मोतिहारी (बिहार) – येथे गणपति विसर्जनाच्या शोभायात्रेवर काही धर्मांध मुसलमानांनी आम्ल फेकल्याने ३ हिंदू घायाळ झाले. त्यांना लगेच रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. २८ सप्टेंबर या दिवशी विसर्जनाची शोभायात्रा शहरातील मधुबन चौकात पोचली असता ही घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे स्थानिक हिंदू संतप्त झाले असून त्यांनी संबंधित धर्मांधांना अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी अजूनपर्यंत कुणालाही अटक केली नसून सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे आक्रमणकर्त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.


मोतिहारीसारख्याच घटना उत्तरप्रदेश राज्यातील कुशीनगर आणि बदायं येथेही घडल्या आहेत. महंमद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने २८ सप्टेंबर या दिवशी कुशीनगर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी काही धर्मांध मुसलमानांनी एका हिंदूच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच सुल्तानपूर येथे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे समोर आले होते. बदायू येथील मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या (शिर धडापासून वेगळे करण्याच्या) घोषणा दिल्या गेल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात ! आता हे जगाला ठणकावून सांगण्याची, तसेच भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी दबाव गट निर्माण करण्याची वेळ आली आहे, हे जाणा !