मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्यामुळे देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधना न शिकवल्यामुळे मुले नीतीवान होत नाहीत. त्यामुळे मोठी झाल्यावर ती बलात्कार, भ्रष्टाचार, गुंडगिरी इत्यादी करतात. तेव्हा बलात्कार इत्यादी करणार्‍यांना रोखण्यासाठी पोलिसांची आवश्यकता असते. हल्ली पोलीसही भ्रष्टाचारी असतात. भ्रष्टाचार इत्यादी करणार्‍यांना आणि भ्रष्टाचारी पोलीस यांना रोखण्यासाठी सरकारी अधिकारी लागतात. सरकारी अधिकारी हेही भ्रष्टाचारी झाले आहेत. त्यांच्या पाठी भ्रष्टाचारी राजकारणी असतात. यामुळे कलियुग शिखराला जाते. हे सर्व होऊ नये; म्हणून गुन्हे होण्याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय केले पाहिजेत, म्हणजे साधना शिकवली पाहिजे. हल्ली हे कुणालाच कळत नाही. त्यामुळे देश पराकोटीच्या रसातळाला गेला आहे. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करून सर्वांना साधना शिकवणे !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले