मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव ८० टक्के भरले !
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2023/08/07230119/mumbai_talaav_700.jpg)
मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव ८० टक्के क्षमतेने भरलेले आहेत. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा ७ तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. हा ८० टक्के पाणीपुरवठा मुंबईकरांसाठी ३०० दिवस पुरेल इतका आहे.