गेल्या ३ मासांत उत्तराखंडमधील ३३० अवैध मजारी उद्ध्वस्त केल्या ! – मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

समान नागरी कायद्यासाठी समितीची स्थापना !

(मजार म्हणजे मुसलमान फकिराचे थडगे)

डेहराडून (उत्तराखंड) – राज्यामध्ये गेल्या ३ मासांमध्ये ३३० अवैध मजारी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उत्तराखंडमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री  पुष्करसिंह धामी यांनी दिली. तसेच त्यांनी ‘समान नागरी कायदा राज्यात लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती दिली. ‘या समितीचे काम जून २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे’, अशी माहितीही त्यांनी दिली.

संपादकीय भूमिका 

जर उत्तराखंड सरकार अवैध मजारी पाडू शकते, तर अन्य राज्ये असे का करत नाहीत ?