मुंबई विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहात ८ मासांपासून पाणीच नाही !

  • संतप्त ७० विद्यार्थिनींचे आंदोलन

  • तक्रारींकडे दुर्लक्ष

मुंबई – जागतिक दर्जाच्या मुंबई विद्यापिठातील धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतीगृहात गेल्या ८ मासांपासून पाणी नाही. त्यामुळे तेथील ७० विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय झाली आहे. अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने विद्यार्थिनी संतप्त झाल्या आहेत. (तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षाच करायला हवी ! – संपादक) त्यामुळे विद्यार्थिनींनी या विरोधात आंदोलन केले.


मुलींच्या वसतीगृहात पाण्याची कमतरता असेल, तर पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. (८ मासांनंतर असे निर्देश देणार्‍या विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पाण्याअभावी विद्यार्थिनींना आंदोलन करावे लागणे विद्यापीठ प्रशासनाला लज्जास्पद !