बिहारमधील प्रिया दास नावाच्या तरुणीने चुलीवर मनुस्मृति जाळून त्याद्वारे पेटवली सिगारेट !

सामाजिक माध्यमांतून घटनेचा व्हिडिओ प्रसारित

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

नवी देहली – बिहारमधील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात एक तरुणी मनुस्मृति जाळतांना दिसत आहे. या व्हिडिओचे काही जणांकडून समर्थन करण्यात येत आहे, तर काही जणांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्याचे म्हटले आहे.

या व्हिडिओतील तरुणी प्रिया दास हिच्या हातात सिगारेट आहे. ती चुलीजवळ बसली आहे. चुलीवर कोंबडीचे मांस शिजवण्यात येत आहे. तरणी तिच्या शेजारी भूमीवर ठेवलेली मनुस्मृति हातात घेते आणि चुलीत टाकून ती जाळते. ती जळत्या मनुस्मृतीद्वारे तिच्या हातातील सिगारेट पेटवते. ती म्हणते की, मनुस्मृति जाळणे केवळ सांकेतिक घटना आणि तात्कालिक घटना आहे. याचा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वीच स्पष्ट केला असून तो म्हणजे एक व्यक्तीच्या विरोधात नाही, तर पाखंड आणि ढोंगी विचारांवर वार करणे हा आहे.

संपादकीय भूमिका

  • मनुस्मृति जाळणे आता ‘फॅशन’ झाली आहे; मात्र अशा लोकांना ‘कोणतेही पुस्तक जाळल्याने त्यातील विचार नष्ट होत नाहीत’, हे कधी लक्षात येत नाही !
  • जगाला ज्या जिहादी आतंकवादामुळे डोकेदुखी निर्माण झाली आहे, त्या जिहाद मागील विचार कुठून येतात, त्याविषयी कुणीही तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या ! जर कुणी बोललेच तर त्याचा परिणाम शिरच्छेदच आहे, हे स्पष्ट असल्याने सगळेच गांधींच्या माकडांप्रमाणे कृती करतात !