नगर येथे शिवजयंती साजरी केली म्हणून ११ धर्मांधांकडून हिंदु युवकाला मारहाण !

तक्रार प्रविष्ट करून घेण्यास पोलिसांकडून विलंब !

(प्रतिकात्मक चित्र)

नगर – येथील शेवगाव तालुक्यातील दहीगाव येथे १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती साजरी झाली. त्यानिमित्त गावात भगवे झेंडे लावल्याचा राग मनात धरून दुसर्‍या दिवशी सकाळी शिवजयंतीचे नियोजन करणारे श्री. अमोल जिरे यांना काही धर्मांधांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी साहील पठाण, मतीन बागवान, जहांगीर शेख, बंटी बागवान, शेख सोन्या (ग्रामपंचायत सदस्य), यजाज शेख, सोहेल पठाण, साहील पठाण, मुनाफ शेख जावेद शेख, सलमान शेख आदींविरुद्ध श्री. अमोल जिरे यांचे भाऊ श्री. दीपक जिरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.

राजकीय दबावामुळे पोलिसांनी तक्रारीचे खरे कारण नमूद केले नाही ! – तक्रारदाराचा आरोप

दीपक जिरे यांनी सांगितले की, राजकीय दबावामुळे पोलिसांनी तक्रारीचे खरे कारण नमूद केले नाही, तसेच तक्रारही रात्री विलंबाने प्रविष्ट करून घेतली. जहांगीर शेख मुख्य आरोपी असूनही केवळ राजकीय वरदहस्तामुळे त्याच्यासहित अन्य आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. (‘अशा कर्तव्यचुकार पोलिसांमुळे धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नाही’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदूंनी वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत, तसेच यापुढे धर्मांधांकडून असे धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • असे व्हायला नगर भारतात आहे कि पाकमध्ये ? धर्मांधांच्या या मुजोरीविषयी आता कुणीच का बोलत नाही ?
  • अशांना तात्काळ अटक होऊन कठोर शिक्षा होण्यासाठी समस्त हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !