गीतेचे सार !

श्री गोंदवलेकर महाराजांना एका भक्ताने विचारले, ‘‘महाराज आम्हाला गीता कधी कळायची ?’’ श्री महाराज म्हणाले, ‘‘वाचून कळत नसेल, तर त्या पुस्तकावरचे चित्र लक्षात ठेव. अर्जुनाच्या रथाचे दोर भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातात धरले आहेत. आपल्या जीवनाची दोरी भगवंताच्या हातात आहे, हे कळले की, गीता कळली !’’ (साभार : सामाजिक माध्यम)