इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी; लोणावळ्यातून विसर्गाला प्रारंभ !

आळंदी (जिल्हा पुणे) – लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास प्रारंभ झाला आहे. लोणावळा धरणात जलाशय पातळी ६२३.९८ मीटर झाली असून पाणीसाठा ७.११ द.ल.घ.मी. (६०.७४ टक्के) आहे. विसर्ग टाळण्यासाठी अधिकाधिक पाणी पश्चिमेकडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये, तसेच पुढील ४८ घंट्यांत इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क रहाण्याचे आणि नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे अन् इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.