पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना २० सहस्र रुपयांचा दंड !

अमरावती सत्र न्यायालयाचा निकाल !

बच्चू कडू

अमरावती – माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी वर्ष २००५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करतांना पोलिसांसमवेत वाद घातला होता. ४ जुलै या दिवशी या प्रकरणी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे (क्रमांक १) न्यायाधीश एस्.एस्. अडकर यांनी विविध कलमांन्वये कडू यांना दोषी ठरवून २० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख ५ ऑगस्ट २००५ या दिवशी जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. बैठकीच्या वेळेत आमदार कडू यांनी तापी नदी प्रकल्पासंदर्भात ‘मडके फोडा’ आंदोलन केले होते. या वेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.