औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्याचा प्रस्ताव संमत !

अंततः मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय !

मुंबई – औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव २९ जून या दिवशीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. सर्वानुमते या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडी सरकारची बैठक बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशी, म्हणजे २९ जून या दिवशी पार पडली. शिवसेनेकडून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याची मागणी वर्षानुवर्षे करण्यात येत होती. यासह नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावही याच वेळी संमत करण्यात आला.