वर्ष १९८४ मधील शीखविरोधी दंगल घडवणाऱ्या ५ नव्या आरोपींना अटक !

कानपूर (उत्तरप्रदेश) – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तान्यांनी वर्ष १९८४ मध्ये केलेल्या हत्येनंतर शीखविरोधी दंगल उसळली होती. यातील ५ नव्या आरोपींना कानपूर येथून अटक करण्यात आली आहे. हे आरोपी दंगलखोरांच्या अशा समूहामध्ये सहभागी झाले होते, ज्यांनी एका घराला आग लावल्याने १२७ लोक ठार झाले होते. घरामध्ये १२ कुटुंबे रहात होती. यांपैकी बहुतेक जण भाडेकरू होते. सर्वाेच्च न्यायालयाने ३ वर्षांपूर्वी दंगलीचे नव्याने अन्वेषण करण्याचे आदेश दिल्यानंतर उत्तरप्रदेश सरकारने एका विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली होती. पथकाकडून वरील कारवाई करण्यात आली.